yuva MAharashtra सर्वांग सुंदर, सर्वोत्तम भारत घडविणे हा महाराष्ट्राचा ध्यास - प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून जनतेला शुभेच्छा !

सर्वांग सुंदर, सर्वोत्तम भारत घडविणे हा महाराष्ट्राचा ध्यास - प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांकडून जनतेला शुभेच्छा !

संग्रहित फोटो

| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २६ जानेवारी २०२५

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील नागरिकांना शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी आपल्या संदेशात म्हटले आहे की, "सर्वांग सुंदर, सर्वोत्तम भारत घडविणे हा महाराष्ट्राचा ध्यास आहे. त्यासाठी निर्धार करूया." 

मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या विविध क्षेत्रांतील योगदानाचा उल्लेख केला आहे, ज्यात शेती, सिंचन, शिक्षण, आरोग्य, उद्योग, ऊर्जा आणि पायाभूत सुविधा यांचा समावेश आहे. तसेच, सामाजिक न्याय, पर्यावरण आणि वातावरणीय बदलांबाबतही महाराष्ट्राने उल्लेखनीय कामगिरी केली असल्याचे त्यांनी नमूद केले. 


आपल्या संदेशाच्या शेवटी, मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व भेद बाजूला ठेवून परस्पर स्नेह आणि सौहार्द वाढवण्याचे आवाहन केले आहे, तसेच सर्वश्रेष्ठ, सर्वांग सुंदर आणि सर्वोत्तम भारत घडविण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले आहे. 

प्रजासत्ताक दिनानिमित्त, मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या वर्षा निवासस्थानी ध्वजारोहणही केले.