| सांगली समाचार वृत्त |
सांगली - दि. ५ ऑक्टोबर २०२४
आजच्या राजकारणात जात, पैसा आणि गुन्हेगारी हे निकष बनले असल्याचे दिसत आहे. त्याचे शुद्धीकरण करायचे असेल तर महाराजांच्या कर्तृत्वाचे, गुणवत्तेचे, त्यांच्या शासन पद्धतीचे, प्रशासकीय कौशल्याचे, फोन करून राजकारणात असलेल्या लोकांनी जास्तीत जास्त केले पाहिजे असे मत केंद्रीय भूपृष्ठ व रस्ते वाहतूक मंत्री ना. नितीन गडकरी यांनी सांगली येथे मराठा समाज भवनात छत्रपती शिवाजी महाराज सिंहासनाधीष्ठ पूर्णाकृती पुतळ्याच्या अनावरण प्रसंगी केले.
येथील मराठा समाज संस्थेला 75 वर्षे पूर्ण झाल्याने अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ नेते खा. शरद पवार, खा. विशाल पाटील, पालकमंत्री ना. डॉ. सुरेशभाऊ खाडे, आ. सुधीरभाऊ गाडगीळ, माजी खा. राजू शेट्टी, माजी मंत्री आ. डॉ. विश्वजीत कदम, अध्यक्ष संजय काका पाटील, महादेव जानकर, माजी आ. नितीन शिंदे, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बरोबरीने स्वराज्यसाठी झालेल्या मावळ्यांचे वंशज तसेच मराठा समाजाचे सर्व माजी अध्यक्ष, खजिनदार विकास मोहिते यांच्यासह सांगली परिसरातील शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना ना. गडकरी पुढे म्हणाले की, देशाच्या इतिहासातील 'झाले बहु, होतील बहु परंतु या सम हाच' असे छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व होते. त्यांचे स्वराज्य हे सर्वधर्म समभाव सांभाळणारे होते. आदर्श पिता, आदर्श पुत्र, आदर्श प्रशासक, कर्तव्यनिष्ठुर, रयतेबद्दल समर्पित भावनेने काम करणारा, त्यागी, तपस्वी राजा असे त्यांचे स्मरण करावे लागेल. असे सांगून ना. गडकरी म्हणाले की, त्यांनी शत्रूंच्या स्त्रियांचाही सन्मान केला. भूतकाळात तीन इतिहासाचे वर्तमान काळात स्मरण केले तर भविष्यकाळ कसा घडवायचा याची प्रेरणा ही इतिहासातून मिळते. सध्याच्या राजकारणावर भाष्य करताना ते म्हणाले की, सध्या जात, पैसा आणि गुन्हेगारी हे राजकारणाचे निकष बनले आहेत. त्याचे शुद्धीकरण करायचे असेल तर महाराजांच्या कर्तृत्वाचे, गुणवत्तेचे, त्यांच्या शासन पद्धतीचे, कौशल्याचे अनुकरण करण्याची गरज आहे.
राजमाता जिजाऊ यांनी शिवरायांवर संस्कार केले त्यातूनच त्यांनी सर्वसमावेशकता आणि सर्वधर्म समभाव याचे आयुष्यभर पालन केले. त्यामुळे ते आदर्श राजा होते. छत्रपती शिवाजी महाराजांचा आपण कुठला गुण घेऊ शकतो आणि स्वतःचा विकास करू शकतो, याचा विचार करण्याची गरज आहे. कुठलीही व्यक्ती, जात, पंथ, धर्म, भाषा यांनी मोठी होत नसते तर ती गुणाने, करतो तुम्हाला मोठी होत असते.
छत्रपती शिवाजी महाराज युग प्रवर्तक राजे होते. त्यांचे गुण जर आपण प्रत्येकाने घेतले तर आपला समाज, आपला देश, आज आहे त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने पुढे जाईल. आत्मनिर्भर भारत, 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था, विश्वगुरू व्हायचं असेल तर त्यासाठी आपल्याला बदलावे लागेल. आज मराठा समाज भवनात उभारण्यात आलेला पूर्णाकृती पुतळा भविष्यातील अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील. नवीन पिढी समोर छत्रपती शिवाजी महाराज कसे पोहोचते यासाठी तंत्रज्ञानाचा उपयोग केला पाहिजे अशी अपेक्षाही यावेळी ना. गडकरी यांनी व्यक्त केली.
आपल्या मनोगत बोलताना ज्येष्ठ नेते मा. शरद पवार म्हणाली की, मराठा समाज लढवय्या आहे. सर्वांना बरोबर घेऊन देशाला पुढे नेण्याचे काम मराठा समाज करतो, तोच खरा मराठा होय. ज्या ठिकाणी ऑक्सिजन कमी आहे, राहण्याची उत्तम व्यवस्था नाही अशा जगातील उंच ठिकाणी देशाचे संरक्षण करण्यासाठी मराठा जवान जीवाची बाजी लावतो आहे. सांगलीतील मराठा समाज संस्थेने समाजातील अंधश्रद्धा, चुकीच्या प्रथा दूर करण्यासाठी कायमच प्रयत्न केला आहे. सर्व समाजाच्या उन्नतीसाठी संस्थेचे योगदान मोठे आहे. देशाच्या प्रगतीत योगदान असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व राजर्षी शाहू महाराज यांचे विचार, बहुजन समाजाला देण्याचे काम संस्था करते आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात देशाच्या कानाकोपऱ्यात अनेक राजे होऊन गेले, यातील अनेकांना नावाने किंवा आडनावाने समाज ओळखत होता. मात्र छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळातील सत्ता मात्र रयतेचा राजा, हिंदवी स्वराज्य अशी करून देण्यात येत होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील हा विश्वास देशातील नागरिकांसाठी यातील उगवणारा आहे. मराठा समाज संस्थेमार्फत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रासह अनेक उपक्रम राबविले जातात, याबद्दल मा. शरद पवार यांनी कौतुकोद्गार काढले.
आ. डॉ. विश्वजीत कदम आपल्या मनोगत बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास डोळ्यासमोर ठेवून मराठा समाज जिल्ह्यात कार्यरत आहे. 1972 पासून मराठा समाजाने चांगले काम केले आहे. मराठा समाजाचे व्याप्ती वाढवावी, त्यासाठी काही निर्णय धाडसाने घेण्याची सूचना यावेळी त्यांनी केली.
या कार्यक्रमासाठी आ. मानसिंगराव नाईक, आ. सुमनताई पाटील, माजी आ. विलासराव जगताप, माजी आ. उल्हास पाटील, माजी आ. शिवाजीराव नाईक, माजी आ. दिनकरतात्या पाटील, माजी आ. नितीन शिंदे, सांगली जिल्हा शहराध्यक्ष पृथ्वीराजबाबा पाटील, वैभव शिंदे, संग्राम देशमुख, मिरजेच्या पद्माराजे पटवर्धन, मराठा समाजाचे अध्यक्ष अभिजीत पाटील, ए. डी. पाटील इत्यादी मान्यवर उपस्थित होते.