Sangli Samachar

The Janshakti News

काँग्रेस भाकरी पलटणार, काँग्रेसचा हात यंग ब्रिगेडच्या हातात; कुणाच्या हातात नारळ, कोणाच्या हाती नवी जबाबदारी !


| सांगली समाचार वृत्त |
नवी दिल्ली - दि. ३१ ऑगस्ट २०२४
लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेसने कात टाकली असून संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल करण्यात येत आहेत. यामध्ये अनेक दिग्गज बाद झाले असून, आता काँग्रेसचा हात यंग ब्रिगेड च्या हातात देण्यात आल्याचे चित्र नव्याने जाहीर करण्यात आलेल्या सचिव आणि सहसचिवांच्या यादीवर नजर टाकल्यानंतर दिसून येते. पक्षाचे संघटन सरचिटणीस के सी वेणू गोपाल यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीनुसार काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी विविध राज्य आणि केंद्रशासित प्रदेशासाठी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी सचिव आणि सहसचिवांचे नियुक्ती केली आहे हे अधिकारी संबंधित राज्यातील पक्षाच्या सरचिटणीस आणि प्रभारींशी संबंधित असतील. काँग्रेसने जाहीर केलेल्या प्रसिद्धी पत्रकात, पदाधिकारी नियुक्तीत खालील प्रमाणे बदल दिसून येत आहेत.

📍काँग्रेस अध्यक्षांच्या कार्यालयातील समन्वयाची जबाबदारी असलेले प्रणव झा आणि गौरव पंधी यांना AICC सचिव करण्यात आले आहे.
📍पक्षाच्या संपर्क विभागांतर्गत एआयसीसी सचिवाची भूमिका बजावणारे विनीत पुनिया हे यापुढेही ही जबाबदारी पार पाडतील.
मात्र, त्यांच्यासोबत रुचिरा चतुर्वेदी यांचीही या विभागात सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
📍राजस्थानमधील दोन माजी आमदार दानिश अबरार यांची दिल्ली आणि दिव्या मदेरणा यांची जम्मू, काश्मीर आणि लडाखसाठी सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.


📍अखिल भारतीय महिला काँग्रेसच्या माजी कार्यवाहक अध्यक्ष नेता डिसोझा आणि माजी एनएसयूआय अध्यक्ष नीरज कुंदन हे पक्षाचे संघटक सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांच्यासह AICC सचिव म्हणून काम करतील.
📍धीरज गुर्जर, प्रदीप नरवाल, राजेश तिवारी आणि तौकीर आलम हे पूर्वीप्रमाणेच उत्तर प्रदेशमध्ये AICC सचिव म्हणून काम पाहतील.
📍माजी केंद्रीय मंत्री दिवंगत शरद यादव यांची कन्या सुभाषिनी यादव यांचीही सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
📍झारखंड सरकारमधील मंत्री दीपिका पांडे सिंह यांना सचिवपदाच्या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.
📍सचिव म्हणून हिमाचल प्रदेशचे सहप्रभारी असलेले राज्यसभा सदस्य रंजित रंजन यांनाही या जबाबदारीतून मुक्त करण्यात आले आहे.
उत्तराखंड विधानसभेचे सदस्य काझी निजामुद्दीन हे सचिव राहतील, परंतु त्यांच्याकडे राजस्थानऐवजी महाराष्ट्राचे सहप्रभारी म्हणूनही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.