Sangli Samachar

The Janshakti News

साधा नगरसेवकही नाही मग त्या 'खास' माणसाला वाय सुरक्षा का ? अनिल देशमुख


| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. ३० जुलै २०२४
अनिल देशमुख व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील वादाने आता एक नवा मुद्दा उपस्थित झाला आहे. मागील आठवड्यात अनिल देशमुख यांनी पत्रकार परिषद घेऊन, उद्धव व आदित्य ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पार्थ पवार तसेच अनिल परब यांच्यावर गंभीर आरोप करावयाचा मसुदा असलेला इनव्हलप घेऊन तीन वर्षांपूर्वी समित कदम या नावाची व्यक्ती माझ्याकडे आली असल्याचा आरोप देशमुख केला होता.

समित कदम हा देवेंद्र फडणवीस यांचा खास माणूस असून, फडणवीस यांची पत्नी कदम याला राखी बांधते असा दावा करीत देशमुख यांनी त्यांचे काही फोटो हे प्रसारमाध्यमांना दाखवले इतकेच नव्हे तर, समिती कदम हा साधा कार्यकर्ता आहे तरीही फडणवीस यांनी त्याला वाय श्रेणीतील सुरक्षा का दिले असा सवाल उपस्थित केला आहे.


दिशा सालीयनवर अत्याचार करून त्यांना ढकलून दिलाचा आरोप करण्यासाठी ही माझ्यावर दबाव टाकला गेला परंतु मी हे मान्य केले नाही. इतकेच नव्हे तर अजित पवारांनी गुटखा व्यवसायाकडून कोट्यावधीची कमाई करून देण्यास सांगितले असा जबाब तपास यंत्रणासमोर द्या आणि शंभर कोटींच्या वसुली प्रकरणातून सुटका मिळवा अशी ही ऑफर मला देण्यात आली होती. परंतु या साऱ्यांचा इन्कार केल्यामुळेच मला 13 महिने कारावासात काढावे लागले असे देशमुख यांनी म्हटले आहे.

दरम्यान गृहमंत्री पदावर कार्यरत राहिलेल्या अनिल देशमुख सारख्या उच्चपदस्थ व्यक्तीने आरोप केल्यामुळे समित कदम हे सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आले आहेत. सध्या सांगली जिल्ह्यातही याच बाबत मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.