Sangli Samachar

The Janshakti News

गजरा का माळावा ? शृंगारासाठी की आरोग्यासाठी ?


| सांगली समाचार वृत्त |
दि. ७ जुलै २०२४
गजरा हा "old fashioned" आहे म्हणे. आधुनिकतेच्या नावाखाली आपण आपल्या जुन्या, चांगल्या गोष्टी पण टाळू लागलो आहोत का ?... खरं तर गजरा हा शब्द उच्चारला की कसं आल्हाददायक वाटतं ना ?. सोळा शृंगारामध्ये गजऱ्याचा समावेश आहे. गोवा, कर्नाटकातील ९०% स्त्रिया आजही रोज गजरा माळल्याशिवाय नोकरीला जात नाहीत.

'गजरा - सौंदर्य' या दोहोंमधील संबंध सर्वश्रुत आहेच. पण निसर्गात पाहिलं ऐन उन्हाळ्यात मोगरा, चाफा, बकुळी यांना बहर येतो. काळजी आहे हो निसर्गाला आपली. या सर्वात जास्त सुगंध पसरविणाऱ्या फुलांची योजना उन्हाळ्यातचं केली गेली आहे हे लक्षात येतय का ?

आयुर्वेदाच्या दृष्टीने ही सर्व फुले शीत गुणाची आहेत. म्हणजे उष्णतेची तीव्रता कमी करायला याचा आपण उपयोग करायलाच हवा. सोपा उपाय म्हणजे गजरा माळणे. केसातल्या गजऱ्याचा तो मंद वास दिवसभर तजेला देत रहातो. मन शांत करतो.

स्त्री शरीर हे मुख्यतः उष्ण धर्माचे मानले जाते. दोन भुवयांमध्ये आतील बाजूस असलेल्या 'pituitary gland' च्या अधिपत्याखाली स्त्री शरीरात विविध स्त्राव वहात असतात. त्यावरच स्त्रीचे आरोग्य अवलंबून असते. गजरा, किंवा फुलांचा वास नाकाद्वारे आपण जेव्हा घेतो, त्यावेळी शिरोभागातील पित्त शमन होते, शिवाय ग्रंथीचे कार्य व्यवस्थित रहाण्यास मदत होते. परिणामी स्त्रियांच्या आरोग्यामधील संतुलन रहाण्यास मदत होते..


मनोरोगात तर फुलांना खूप महत्व आहे. स्त्रियांमध्ये दर महिन्याला होणाऱ्या संप्रेरकांच्या चढ उतारामुळे होणाऱ्या चिडचिडीमध्ये गजरा घातला तर नक्कीच फायदा होतो. शिवाय गजरा करायच्या पध्दती पाहिल्या तर त्या पण "concentration", "moto development" करणाऱ्याच आहेत. परदेशातील बाक थेरपी, अरोमा थेरपी या काय आहेत. फुलांच्यावर आधारित चिकित्साच आहेत.

पण कसंय... घर की मुर्गी....

भरगच्च पैसे देऊन पाश्चात्यांप्रमाणे अरोमा थेरपी घेऊ. पण भारतीय पद्धती प्रमाणे गजरा माळून घेतल्यावर "old fashioned" म्हणवून घेण्यात लाज का वाटून घ्यावी ? त्यामुळे आता तुमच्या पत्नीने किंवा घरच्या महिलेने गज-याची फर्माईश केली, तर नाके मुरडू नका. तो तात्काळ आणून द्या...


व आता तुम्ही म्हणाल ही बातमी पावसाळ्यात का दिली ? गजरा तर उन्हाळ्यात फायदेशीर असतो ना ? तर मित्रांनो, गजरा फक्त उन्हाळ्यातच नाही, तर प्रत्येक ऋतूत त्या त्या वेळी येणाऱ्या फुलांचा गजरा महिलांनी माळावाच.