Sangli Samachar

The Janshakti News

आपल्या सनातनी, सांस्कृतिक आणि शाश्वत मुळांकडे परतणे कामाची गरज !


सांगली समाचार वृत्त |
पुणे - दि. २७ जून २०२४
"जेव्हा-जेव्हा सूर्य पश्चिमेला जातो तेव्हा तो मावळतो. हे या जगात त्रिवार सत्य आहे".

आपल्याकडे आधीच अमृताने भरलेली भांडी असताना... आपण ते अमृत फेकून चिखलाने का भरतोय...? ह्याचा जरा विचार करा..

☀️मातृनवमी होती तर मग Mother’s day का आणला?

☀️ कौमुदी महोत्सव आहे तर Valentine day कशासाठी?

☀️ गुरू पूर्णिमा आहे तर Teacher’s day कशाला हवाय ?

☀️ धन्वंतरी जयंती आहे तर Doctor’s day कशासाठी?

☀️ विश्वकर्मा जयंती आहे Technology day कशासाठी?

☀️ सन्तान सप्तमी आहे तर Children’s day कशासाठी?

☀️ नवरात्री आणि कन्या भोजन आहे तर Daughter’s day कशासाठी?

☀️ रक्षाबंधन आहे तर Sister’s day कशासाठी?

☀️ भाऊबीज आहे तर Brother’s day कशासाठी?

☀️ आंवळे नवमी, तुळशी विवाह साजरा करणारे हिंदूंना Environment day ची काय आवश्यकता ?

आपल्या हिन्दुंचे सर्व उत्सव किती सुन्दर आहेत बघा:
मकर संक्रांती, वसंत पंचमी, महाशिवरात्री, होळी, चैत्र नवरात्री, राम नवमी, अक्षय तृतीया, नाग पंचमी, जन्माष्टमी, गणेशोत्सव, दसरा, दिवाळी, चंपाषष्ठी, दत्तजयंती इत्यादी सणवार असतात. हे सर्व सणवार गर्वाने साजरे करा. आपल्या कडुन पाश्चिमात्यांचे आंधळेपणाने अनुकरण होणार नाही ह्याची काळजी घ्या...
"जेव्हा-जेव्हा सूर्य पश्चिमेला जातो तेव्हा तो मावळतो." हे या जगात त्रिवार सत्य आहे. आपल्या सनातनी, सांस्कृतिक आणि शाश्वत मुळांकडे परत या. आपले व्रत-वैकल्य, उपवास, विविध सणवार आणि उत्सव साजरे करा. आपली हिन्दु संस्कृती आणि सभ्यता जिवंत ठेवा.