| सांगली समाचार वृत्त |
मुंबई - दि. २१ मे २०२४
जर तुम्ही रुग्णवाहिकेला रस्ता दिला नाही तर तुमच्याविरुद्ध तक्रार दाखल केली जाईल, तुम्हाला दंड भरावा लागेल याची तुम्हाला जाणीव असेल. पण तुम्हाला माहीत आहे का की, रुग्णवाहिका किंवा आपत्कालीन वाहनांना मार्ग न दिल्यास कोणालाही तुरुंगात टाकले जाऊ शकते. भारतीय वाहतूक नियमांनुसार, रुग्णवाहिकेसारखी आपत्कालीन वाहने थांबवल्यास तुरुंगवासाची वेळ येऊ शकते. हे कोणत्या परिस्थितीत होऊ शकते ते जाणून घ्या.
रुग्णाचा मृत्यू झाल्यास तुरुंगवास भोगावा लागू शकतो –
अनेक वेळा ट्रॅफिकमध्ये अडकल्यामुळे लोक रुग्णवाहिकांना रस्ता देत नाहीत. रुग्णवाहिकेत एखादा रुग्ण उपस्थित असेल, ज्याची प्रकृती गंभीर असेल आणि वेळेवर उपचार न मिळाल्याने त्याचा मृत्यू होऊ शकतो. अशा परिस्थितीत रस्ता न देणाऱ्या व्यक्तीला मोठा दंड भरावा लागू शकतो. इतकंच नाही तर अशा परिस्थितीत रुग्णाचा वाटेतच मृत्यू झाला तर रस्ता न देणाऱ्याला तुरुंगवासही होऊ शकतो.
आपत्कालिन वाहनांबद्दल कायदा काय म्हणतो ?
मोटार वाहन कायदा (सुधारणा), 2019 च्या कलम 194E नुसार, जर कोणी अग्निशमन सेवा, रुग्णवाहिका किंवा राज्य सरकारने सूचीबद्ध केलेल्या आपत्कालीन वाहनांच्या मार्गात अडथळा आणला तर त्याला 6 महिने किंवा त्याहून अधिक काळ तुरुंगवास होऊ शकतो. याशिवाय त्या व्यक्तीला दंड किंवा त्याहून अधिक रक्कम भरावी लागू शकते.
यापूर्वी केवळ 500 रुपये दंड होता –
2019 मध्ये केंद्र सरकारने मोटार वाहन कायद्यात अनेक सुधारणा केल्या. त्यानंतर वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दंडाच्या रकमेत वाढ करण्यात आली. यापूर्वी रुग्णवाहिका किंवा आपत्कालीन वाहनाचा मार्ग अडवल्याबद्दल केवळ 500 रुपयांचे चलन काढले जात होते.